15 ऑगस्ट 2014 ला लाल किल्ल्यावरून भाषण करतांना पंतप्रधान मोदींनी स्वतःला प्रधानसेवक म्हटलं.
सरकारी पद हे आम जनतेच्या सेवेसाठी आहे, हे त्यांना सुचवायचं असावं, हा माझा समज आहे.
मनपा आयुक्त हे सरकारी पद आणि म्हणजे मनपातला टीम लीडर !
टीम लीडरचं काम हे स्वतःच्या सहकार्यांना आपल्यासोबत कामाला जोडून घ्यायचं असतं हा म्यानेजमेंटचा बेसिक फंडा.
स्वतःच्या सहकाऱ्यांमध्ये जोश भरून, त्यांना सोबत घेऊन त्यांनी भरीव काम करणं हे नाशिककरांनी अपेक्षित धरलं होतं. पण...
पण मुंढे हे स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडले हे वास्तव आहे. ऐकायला कटू वाटेल पण तेच सत्य आहे.
नाशिक, त्याचा विकास, नाशिककर आणि त्यांचं हित ह्या पेक्षा, माझा माईक आणि माझंच ऐक असं चालू होतं, गेले नऊ महिने !
चांगलं असणं हे तेव्हा वाईट ठरतं जेव्हा ते कुणाच्याच हिताचं असत नाही.
इतिहास साक्षी आहे हो ह्याला.
प्रतापराव गुजर पराक्रमी होते, मान्य ! एकनिष्ठ होते मान्य !! दिलदार होते, मान्य !!!
बहलोळखानाला युद्धात मात दिल्यावर, स्वतःच्या अधिकारात माफी देणं स्वतः छत्रपतींनी मान्य केलं नव्हतं.
वेडात मराठे दौडले वीर सात ! गाणं ऐकायला वाटतं छान पण त्याचा स्वराज्याला उपयोग शून्य.
मुंढे हे प्रतापराव गुजर ठरलेत ! अकरा वर्षात अकरा वेळा बदल्या, प्रसिद्धी साठी छान पण महाराष्ट्र देशी उपयोग शून्य !
आपलं काय आपण नेहमीच अभिमानाने गातो, वेडात मराठे वीर दौडले सात !! पण साथ कोण देणार ?
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment