होय, छिंदम आता तुमच्या छाताडावर बसेल... आहे हिम्मत त्याला उतरवण्याची ?
सातशे -आठशे वर्षांपूर्वी तो चंगेज खान आला..
मग आला खिलजी ... पाठोपाठ निज़ाम अन मुघल ...
मग आला बाबर अन मग अकबर
असेच कोणीबाही येत राहिले.
त्यांनी तुम्हाला ओरबाडलं ... तुमचं घरदारही लुटलं.
तुमच्या आया -बहिणींवर हात टाकला ... त्यांची अब्रूही लुटली.
तुम्ही पाहत होतात षंढासारखे !
मग तुमच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली. अन ...
अन, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला तो तुमचा आमचा शिवबा !
त्याने उभं केलं स्वराज्य !!
मग तुम्ही जगू लागलात अभिमानानं.
मुलं बाळ रांगू लागलं आनंदानं.
घरात लेकी सुना नांदू लागल्या सुरक्षितपणे.
जणू आनंदवन उभं राहिलं.
ह्या शिवबाची थोरवी सांगायची सोडून तो छिंदम.. त्याला शिवी देत होता.
आणि तुम्ही परत षंढाच्या भूमिकेत उभे...
मग तो उभा राहिला तुमच्या नाकावर टिच्चून नगरच्या निवडणुकीला ...
त्यानं दाखवलं मग आमिष पैशाचं ...
मग तुम्ही धावलात त्यामागे हपापल्यासारखे ...
अन तो आला निवडून थाटात ...
आता तो बसेल तुमच्या छाताडावर
अन तुम्ही गुमान वाट पहात राहाल ...
शिवबाने पुन्हा जन्म घेण्याची...
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment