अंगणात चालून दमल्यामुळे धाप लागलेल्या बाई,
आठवतात मला अजून.
दर गुरुवारी
कानिफनाथांची आरती करतांना, बाई कशा तल्लीन व्हायच्या, तेही आठवतंय मला.
नातवांना गोष्टी सांगणाऱ्या बाई.
बागेत कोणती फुलं,
कशी फुलली आहेत ते काळजीनं पाहणाऱ्या बाई.
हिवाळ्यातल्या कित्येक सकाळी, 'स्वीट
कॉटेज'च्या अंगणात गप्पा मारत, कित्येक उन्हं, आम्ही
घेतलीत अंगावर दोघांनी.
बाई काय नव्हत्या ?
नेरळच्या माध्यमिक शाळेच्या नावाजलेल्या मुख्यपाधिका राहिलेल्या होत्या बाई.
समाजवादी विचारांच्या बाई, संस्कार
वर्ग चालवायच्या.
स्वाध्यायीही होत्या बाई.
पुढे जाऊन नवीन शाळाच काढली बाईंनी !
अहो,
बाईंचा एकूण आवाका फार
मोठा होता.
अरे मी तुम्हाला
सांगितलंच नाही बाईंविषयी जास्तीचं.
त्यांच्या माझ्या नात्याविषयीच.
चुकलंच माझं.
बाईंचा विषय आला की होतंच
माझं असं.
माझंच काय,
माझ्या घरच्या सगळ्यांचंच होत असणार !
खात्रीच आहे मला तशी.
बाई होत्याच तशा.
बाई म्हणजे धोंगडेबाई.
दादरच्या शिवाजी पार्काजवळ बाईचं माहेर. माहेरचं नाव देवधर.
घरात सेवादलाच वातावरण.
एम. ए. विथ इंग्लिश शिकलेल्या बाई, लग्नानंतर धोंगडे झाल्या.
अन नेरळला आल्या राहायला, कायमच्या.
बाई, आमच्या
घराच्या मालकीण.
म्हणजे आम्ही रहात होतो त्यांच्या मालकीच्या घरात.
साधारण पस्तीस वर्ष.
आज सांगावं
लागतंय त्या मालकीण होत्या घराच्या ते.
हा,
पण बाईंनी कधी जाणवू दिलं नाही ते शेवटपर्यंत.
हेच तर त्याचं मोठेपण
!
बाई सोशल होत्या आणि नव्हत्याही. एकारलेपण
आवडायचं त्यांना.
बाई गप्पा मारायच्या खूप पण अबोलही
होत्या बाई.
बाई छोट्या छोट्या गोष्टीत रस घ्यायच्या.
तशा बाई विरक्तही
होत्या संसारापासून.
बाई कठोर होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात मायेचा ओलावा जपला होता बाईंनी.
बाई,
माझ्या आईशिवाय जगू शकल्या असत्या का ?
माहीत नाहीं.
पण बाईंमुळे, आई जगू शकली हे मात्र तितकं खरं.
बाईंनी मला काय दिलं?
बाईंनी मला काय नाही दिलं
?
बाईंनी मला वाचायला शिकवलं, अभ्यासाव्यतिरीक्तच.
बाईंनी मला विचार करायला शिकवलं. वैचारीक
मशागत केली माझी.
लिहिण्याची प्रेरणा दिली मला बाईंनी
!
आज बाई
असत्या तर मला बघून काय वाटलं असतं
बाईंना
?
अहं,
नाही सांगता येणार.
कारण बाईसारखा विचार फक्त बाईच करू जाणे
!
बाई,
वेगळ्याच होत्या, एव्हढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो.
बाकी सगळं,
बाईचं जाणोत !!
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment