ऐन तारुण्यात कविता करू पहात होतो,
शब्दांचे फुलोरे फुलवू बघत होतो.
शब्दांच्या मेळात अर्थ निसटून जात होता,
अर्थाच्या गवसणीत शब्द सांडून जात होते.
ज्येष्ठ कवी म्हणाले अक्षरा मधे जीव ओत,
भावनांचा ओलावा शिंपडायला शीक.
प्रेमाचा बगिचा फुलव, मग बघ जादू,
शब्दांचा पाऊस आणि कवितेच भरघोस पीक !
प्रेमाच्या झुल्यावर कविता झोके घेऊ लागली,
स्वप्नाच्या जगात मग हिंडू फिरू लागली.
प्रेमाला मग धुंद प्रणयाचा बहर आला,
अन कवितेला जणू मोगऱ्याचा सुवास आला.
आयुष्याच्या वळणावर वास्तवाची ठेच लागली,
अनुभवाच्या धारदार शस्त्रनि कविता घायाळ झाली.
दुखाच्या आवेगानी अश्रूंचा बांध पुरता फुटला,
वेदनाच्या आर्त कळान्तून विरहगीत प्रसवून गेला.
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment