Monday 13 June 2016

कविता


ऐन तारुण्यात कविता करू पहात होतो,
शब्दांचे फुलोरे फुलवू बघत होतो.


शब्दांच्या मेळात अर्थ निसटून जात होता,
अर्थाच्या गवसणीत शब्द सांडून जात होते. 


ज्येष्ठ कवी म्हणाले अक्षरा मधे जीव ओत,
भावनांचा ओलावा शिंपडायला शीक.
प्रेमाचा बगिचा फुलव, मग बघ जादू,
शब्दांचा पाऊस आणि कवितेच भरघोस पीक !


प्रेमाच्या झुल्यावर कविता झोके घेऊ लागली,
स्वप्नाच्या जगात मग हिंडू फिरू लागली.
प्रेमाला मग धुंद प्रणयाचा बहर आला,
अन कवितेला जणू मोगऱ्याचा सुवास आला.


आयुष्याच्या वळणावर वास्तवाची ठेच लागली,
अनुभवाच्या धारदार शस्त्रनि कविता घायाळ झाली.
दुखाच्या आवेगानी अश्रूंचा बांध पुरता फुटला,


वेदनाच्या आर्त कळान्तून विरहगीत प्रसवून गेला. 

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...